शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

शिवरायांचे बालपण ....

शिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी वर झाला...

नंतर तीन चार महिन्यांनी शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीड वर्ष हे सर्व कुटुंब शिवनेरी वरच एकत्रित होते. "त्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला"...(संदर्भ - छत्रपती शिवाजी - सेतू माधवराव पगडी.). त्या मूळे १६३२ ते १६३६ मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोघालांशी लढण्यात मग्न होते...

पुढे १६३६ च्या उत्तरार्धात .. निजामशाही बुडाल्यावर ... शहाजी राजे आदिलशहा कडे बारा हजारी "फर्जंद " वजीर म्हणून गेले...तहा प्रमाणे शहाजी महाराजांना रानदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले. तहा प्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे पश्चात घेतला व बादशहाच्या आज्ञे प्रमाणे जिजाई वगैरेंना शिवनेरी वरून आपल्या सर्व जीनगी वगैरेसह उतरू दिले. प्रथम जिजाबाईला "चौलात" ठेवायचा शहाजीचा प्रयत्न होता. परंतु पोर्तुगीजांनी तिला त्यांच्या हद्दीतून नेऊन इतरत्र ठेवण्याची सूचना केली. तेव्हा शहाजी राज्याने शिवाजी - जिजाई ला खेड (शिवापूर) ला पाठविले.. तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता...खेड (शिवापूर) हे दादाजी कोंडदेवाने शहाजी महाराजांच्या आज्ञेवरून नुकतेच वसवले होते..

पुढे इ.स. १६३७ च्या अखेर जिजाई शिवाजीसह कर्नाटकात गेली असे कागदपत्रां वरून स्पष्ट होते. कर्नाटकात कंपिलीला शहाजी राज्यांच्या सोबत १६३७ ते १६४२ साला पर्यंत शिवाजी आणि जिजाऊ हे तिथेच होते... तिथे शहाजी महाराजांनी शिवाजी ७ वर्षाचा झाल्यावर.. अक्षर ओळख व जुजबी गणित त्यावेळच्या पद्धतीने शिकवले. त्या काळी एवढेच काय ते शिक्षण "अध्ययना" खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे. परंतु वडिलांच्या व्यावहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता. वैश्यांना आपल्या हिशोबा पुरता लेखन वाचनाचा सराव असे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर , जर त्यात धंदा रोजगार करावयाचा असेल तरच तो या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करी..अन्यथा वंशातील मोठ्या माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या कडून पारंपारिक कला कौशल्य शिकत असे ..

त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली, तलवारबाजी, घोडेस्वारी तश्याच अन्य कला त्या त्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या व्यक्तींकडून याच काळात घेतले..

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. राजनीती चे डाव पेच अथवा.. राज कारभाराची कार्य पद्धती.. हे सर्व शिवाजी महाराजांनी ह्या काळात आपले वडील शहाजी महाराज व वडील बंधू संभाजी महाराज ह्यांच्या कडून शिकले...

याच दरम्यान १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराज यांचे लग्न निम्बालकर पवार यांच्या "जिऊबाई" नावाच्या मुलीशी झाले. तिचे सासरचे नाव "सईबाई" असे ठेविले.

पुढे १६४२ साली...शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थाने वाढली...रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा पोरगा कम कर्तुत्वी निघाल्याने अफजल खानाला त्याची जहागीर मिळाली.व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजी महाराजांविरुद्ध कारस्थान रचले..त्या नुसार.. शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून आदिलशाहने काढून घेतला..व त्यांचेच भाऊ बंद बाजी घोरपड्यास दिला ....तसेच शहाजी राजे ह्यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाड्याने कापली . हे सर्व बघून आदिलशाही तील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे बघून शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला.. त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्याने आदिला शहशी लावून ठेवले... १६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत...पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले...

ह्या मूळे शहाजी राज मोघालांशी संधान साधतोय कि काय ह्याची भीती आदिलाशाहाला झाली त्या मूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदा टाकत.. शहाजी राज्यांना काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला...

१६४४ साली आदिलशाहने शहाजी राज्यांची आधीच्या (काढून घेतलेल्या ) ४ लक्ष जहागिरी ऐवजी ५ लाखाचा सुभा बंगलोर दिला...व तिकडे रवाना केले..(अर्थात शहाजी राज्यान सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलानकडे जाने चांगले नाही ह्या भीतीने शहाजी राज्यांशी आदिलशाहने जुळवून घेतले.. व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला रवाना केले...

इथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजी राज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेश पाठवले होते...

परिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजी राजे पुन्हा एकदा यशस्वी झाले...

अवघ्या १२-१३ व्या वर्षी शिवाजी राज्यांना स्वतंत्र वाट चाल करावी लागली पण...स्वतः शहाजी महाराज व शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजी महाराजांवर देखील याच वयोमानात अश्या प्रकारची जवाबदारी अंगी पडली होती हे नमूद करण्यासारखे आहे...तर शहाजी महाराजांना त्यांच्या लहान पणी (१० व्या वर्षी ) अश्याच प्रकारे जवाबदारी पडली असतांना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजी राजे ह्यांचा आश्रय अथवा मार्ग दर्शन मिळाले.. तर.. शिवाजी राज्यांचे वडील बंधू संभाजी राजे यांना तर अश्या (९ व्या वर्षी ) वेळेत स्वतः शहाजी राज्यांचे मार्ग दर्शन मिळाले..

तर शिवरायांना मार्ग दर्शन मिळाले ते जिजाऊन्चे..त्या बाबत सविस्तर माहिती पुढे घेऊयात...
संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक-वा.सी.बेंद्रे.१९७२
संदर्भ ग्रंथ- chatrapati Shivaji- सेतू माधवराव पगडी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा